У вашего броузера проблема в совместимости с HTML5
राफेल प्रकरणावरून सुरू झालेले राजकीय मतभेत आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येतायत की काय असं वाटायला लागलंय कारण राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप दोघांनीही एकमेकांवर बेफाम आरोप करायला सुरवात केली आहे.. मोदी सरकाविरोधात अविश्वास ठराव आला होता त्यातही मुख्य मुद्दा राफेल विमान खरेदीचाच होता.. काँग्रेस एवढ्यावर थांबली नाही तर पंतप्रधान मोदींवर आरोपाच्या फैरी सुरूच राहील्या ... भाजप नेतेही गप्प बसणाऱ्यातले नव्हते.. त्यांनीही प्रत्यूतर वेळोवेळी दिलंच मात्र या आरोपांची तीव्रता इतकी वाढली की देशाच्या पंतप्रधांनांना चोर म्हणण्याइतकी मजल काँग्रेसची गेली आणि भाजपनंही त्याच पातळीवरून प्रत्यारोप करत या वादातली तीव्रता कायम ठेवली.. भीती अशी आहे की या राजकीय लठ्ठालठ्ठीत राफेल अडकतंय की काय... आण या सगळ्या वादात देशाच्या सुरक्षेवर कोणते दुष्परीणाम होतील की काय असाही प्रश्नच आहे..